
अहिल्यानगर शहरातील तोफखाना आणि एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांना तब्बल एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
या टोळीविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवणे, घातक हत्यारे बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे तब्बल आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सखोल चौकशीअंती आशिष ऊर्फ पप्पू अंतोन पाटोळे (२२, रा. नागापूर), अमोल गोरख आव्हाड (२४, रा. काकासाहेब म्हस्के रोड) आणि सुरज ऊर्फ खंडू अरविंद भिंगारदिवे (२२, रा. नागापूर) या तिघांविरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात आली.




