ब्रेकिंगमहाराष्ट्र
परवाना नसलेल्या व भंगारात काढलेल्या शेकडो रिक्षांवर कारवाई झाली नाही, तर स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून घेराव घालण्याचा इशारा
अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरात परवाना नसलेल्या व भंगारात काढलेल्या शेकडो रिक्षा राजरोसपणे धावत आहेत.
केवळ 3 प्रवाश्यांचा परवना असलेल्या रिक्षांमधून सर्रास जादा 10 ते 12 प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक होत आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना पाठीशी घालणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई व्हावी, या मागणीचे निवेदन अहिल्यानगर जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष विलास कराळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना दिले.
कारवाई झाली नाही, तर स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.




