
धोकादायक इमारती मालकांनी स्वतःहून काढून घ्याव्यात, अन्यथा कारवाई :- आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे.
महानगरपालिका प्रशासनाने शहरातील १५ अती धोकादायक अवस्थेतील इमारती पडण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यात बहुतांश इमारती या मध्य शहरातील आहेत व त्यातील काहींचा वापरही सुरू आहे. या इमारती उतरवून घेण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. सर्जेपुरा परिसरातील एका धोकादायक इमारतीचा धोकादायक भाग उतरवून घेण्यात येत आहे.
नागरिकांनी धोकादायक अवस्थेतील इमारती स्वतःहून काढून घ्याव्यात, अन्यथा महानगरपालिका कारवाई करून काढतील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.




