
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य सरकार जरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. जरांगे यांच्या प्रकृतीला जर काही बरे वाईट झाले तर राज्यात भाजप औषधालाही शिल्लक ठेवणार नसल्याचा इशारा मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिला. त्याच बरोबर सरकारने तातडीने हालचाली करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
महादेव साळुंखे म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी अनेक नेत्यांनी आत्मबलिदान दिले आहे. राज्यामध्ये सध्या सहा कोटी मराठा समाज आहे. मराठ्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे.
आज मराठा समाजाची परिस्थिती ही बारा बलुतेदारांसारखी झाली आहे. मराठा समाज दारिद्र्यरेषेखाली गेला आहे. मराठा समाजाची आर्थिक सामाजिक परिस्थिती ही हलाखीची झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चुकीची माणसे खोडा घालत आहे