
मराठवाड्यासह संभाजीनगर जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
जून अखेरपर्यंत मराठवाड्यातील ९०० पेक्षा जास्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, असा अंदाज आहे. माणसांचे आणि जनावरांचे पाण्यासाठी हाल होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.