ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

क्रिकेटमध्ये आला नवा नियम

नवी दिल्ली

आयसीसीने टी – २० आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी एक नवा नियम लागू केला आहे. सध्या हा नियम फक्त पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी – २० आणि एकदिवसीय सामन्यांसाठी आहे.

या नियमानुसार गोलंदाजी करणाऱ्या संघाला दोन षटकांत ६० सेकंदांपेक्षा कमी कालावधीचे अंतर ठेवण्याचे बंधन असेल. दोन षटकांत ६० सेकंदांपेक्षा जास्त कालावधी वाया गेला तर त्याची नोंद केली जाईल. ही चूक तीन वेळा केली तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला थेट पाच धावांचा दंड केला जाईल.

भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात २३ नोव्हेंबरपासून टी – २० मालिका सुरू होत आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेपासून नवा नियम लागू होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे