ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनदेश-विदेश

नवव्या विजयासह भारताने रचला इतिहास

बंगळूर

भारतासाठी हा फक्त एक विजय ठरला नाही. या विजयासह भारतीय संघाने इतिहास रचला आहे. आतापर्यंत भारतीय संघाला अशी कामगिरी कधीच करता आली नव्हती. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मात्र भारतीय संघाने यावेळी इतिहास रचला आहे.

या वर्ल्ड कपची सुरुवात भारताने ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला पराभूत करून केली होती. त्यांनतर एकामागून एक भारताने विजय मिळवले. पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यासारख्या दिग्गज संघांना भारताने पराभूत केले. त्यानंतर आता भारताने नेदरलँड्सला पराभूत करत वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतील आपला अखेरचा सामनाही जिंकला आहे. भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. जो आतापर्यंत एकाही संघाला या वर्ल्ड कपमध्ये जमलेला नाही. यापूर्वी भारताने १९८३ आणि २०११ या वर्षी झालेले वर्ल्ड कप जिंकले होते. कपिल देव आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताला वर्ल्ड कप जिंकता आला होता. त्यानंतर आता भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. पण या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला जे जमले नव्हते ते यावेळी त्यांनी करून दाखवले आहे. कारण या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारताला साखळी फेरीत पराभव पत्करावा लागला होता. २०११ चा वर्ल्ड कप सर्वांनाच आठवत असेल. या वर्ल्ड कपमध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पराभूत केले होते. पण या वर्ल्ड कपमध्ये मात्र भारतीय संघ हा अपराजित राहीला आहे. एकही सामना त्यांनी गमावलेला नाही आणि वर्ल्ड कपमध्ये ही गोष्ट भारताकडून पहिल्यांजाच घडली आहे. त्यामुळे भारतीय संघाने एक नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे आता बाद फेरीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारताचा यापुढे सेमी फायनलचा सामना हा न्यूझीलंडबरोबर १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

भारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ अपराजित राहिलेला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे