ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कार्ले बंधूंच्या श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला भीषण आग

अहमदनगर

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील श्री साई समर्थ एग्रो एजन्सीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले.

मंगळवारी सकाळ च्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने ही घटना उघडकीस आली. आग लागल्याचे समजताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. अग्निशमन विभागाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल होत दुकानाला लागलेली आग विझवली. तो पर्यंत दुकानातील बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते, औषधे जळून खाक झाले होते. आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजू शकले नाही.

परंतु आगीत सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे श्री साई समर्थ एग्रो एजन्सीचे संचालक शीतल प्रवीण कार्ले यांनी सांगितले.

श्री साई समर्थ एग्रो एजन्सी शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांचे बंधू यांची आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे