तंत्रज्ञानाच्या युगातही असे वधू वर परिचय मेळावा ही काळाची गरज….नारायण मंगलारम
अहिल्यानगर

श्री मार्कंडेय संकुलात राज्यस्तरीय पद्मशाली उप वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न..
“बदलत्या काळाची गरज ओळखून तंत्रज्ञानाचे युग असले तरी फसवणूक होऊ नये तसेच सुयोग्य व विश्वासार्ह जोडीदार मिळण्यासाठी अश्या राज्यस्तरीय मेळाव्यांचे आयोजन ही काळाची गरज आहे….!!” असे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले.
ते पद्मशाली उप वधू-वर सुचक मंडळ, अहिल्यानगर व मासिक पद्मशाली प्रेरणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय उप वधू-वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकशाही शिक्षक मंचचे ज्येष्ठ शिक्षक नेते व लेखक हिरालाल पगडाल, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम , पेशवाई श्रीमंत क्रिएशनचे राहुल येमुल, मासिक पद्मशाली प्रेरणाचे उपसंपादक प्राध्यापक वीरभद्र बत्तीन, डी चंद्रकांत टेलर्सचे चंद्रकांत दुलम, आनंद दुलम, हॉबी डिझायनर स्टुडिओचे प्रकाश येनगंदुल व त्रिलेश येनगंदुल, नगरसेवक मनोज दुलम, लक्ष्मी टाइम्स वॉचचे संजीव मंचे आदी उपस्थित होते.
येथील श्री मार्कंडेय संकुल, दातरंगे मळा, अहिल्यानगर येथे आयोजित या मेळाव्याला राज्यभरातून उपवधू व वरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
“निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांना समान शक्ती दिल्या आहेत व त्यांचे प्रमाण ही समान ठेवले होते, पण नादान माणसाने त्यात हस्तक्षेप करून मागे अनेक मुलींना गर्भातच मारल्याने आज निसर्गाचे संतुलन ढळले आहे आणि मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी झाली आहे. ही चूक आता तरी सुधारून भविष्यात ही तफावत कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काळानुरूप बदलून आता पद्मशाली समाजानेही तंत्रज्ञानाची मदत विवाह जुळवण्यासारख्य्या गोष्टींसाठी घेतली पाहिजे.” असे ज्येष्ठ शिक्षक नेते हिरालाल पगडाल म्हणाले. तर ,”गुरुवर्य पोट्याना बत्तिन यांनी दाखवलेल्या शिक्षणाच्या मार्गाने आणि माझे सामाजिक कार्याच्या क्षेत्रातील गुरू सेवाव्रती विठ्ठलराव मंगलारम यांच्या संकल्पनेतील या वधू वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून नक्कीच अनेक उपवर वधूना योग्य जोडीदार मिळतील…!!” असे माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम आपल्या मनोगतात म्हणाले.
“परीचयाने जुळती नाते मना-मनाचे, विवाहबंधन हे अनमोल बंध-रेशमाचे” या उक्तीला अनुसरून पद्मशाली समाजातील अनेक उच्चशिक्षित, उद्योगधंद्यांत असलेल्या तरुण-तरुणींची संख्या वाढली आहे. त्यांना योग्य जोडीदार मिळवण्यासाठी तसेच पुनर्विवाह साठी इच्छुक असणाऱ्यासाठी अशा प्रकारच्या राज्यस्तरीय उप वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे…!!” असे प्रस्ताविकात मासिक पद्मशाली प्रेरणाचे संपादक ज्ञानेश्वर मंगलारम म्हणाले.
समाजातील ज्येष्ठांनी केलेल्या कार्यासाठी तळमळ वाटते, समाजातील वधू वर एकमेकांना सुचवा हीच समाजसेवा आहे. चांगलं केलं ते देवाने केलं वाईट केलं त्या व्यक्तीने केलं असं कोणी खदखद व्यक्त करू नये. सुचवणारा फक्त निमित्त असतो असे पद्मशाली वधू वरचे ऋषिकेश गुंडला यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या मेळाव्याच्या निमित्ताने सहभागी राज्यभरातील सर्व उप वधू-वरांच्या बायोडाटांचा समावेश असणाऱ्या स्मरणिकेचे ही लवकरच प्रकाशन करण्यात येणार असल्याचे व नोंदणी केलेल्या सर्व उप वधू-वरांना या स्मरणिकेची मोफत वितरण करण्यात येणार असल्याचे, रघुनाथ गाजेंगी व दत्तात्रय जोग म्हणाले. यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचे ए.पी.आय श्री मंगेश जी गुंटला तसेच आकाशवाणीचे सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी, सेवानिवृत्त शिक्षिका सुरेखा आडम, माजी नगरसेविका सुरेखा विद्ये, पद्मशाली स्नेहिता संघाच्या डॉ. रत्ना बल्लाळ, भिमराज कोडम यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सेवानिवृत्त तहसीलदार राधाकिसन म्याना, शहर बँकेचे संचालक दत्तात्रय रासकोंडा, पद्मशाली महिला शक्तीच्या सारिका मुदिगोंडा, उमा बडगू, सुरेखा कोडम, श्री गिरीश चिट्टा, डॉ. साईनाथ चिंता, रितेश अनमल, मूर्तिकार बालाजी वल्लाल,अरुण अमृतवाड, श्रमिक बालाजी देवस्थानचे विनोद म्याना इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास एल्लारम यांनी केले तर माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटिपामुल यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमार आडेप, रघुनाथ गाजेंगी,ऋषिकेश गुंडला, दत्तात्रय जोग, ज्ञानेश्वर मंगलारम, शिवाजी संदूपटला, रमेश बोगा, शंकर नक्का,बालकीसन आकुल, गणेश आकेन, रमाकांत बिज्जा, विजय येनगंदुल, श्रीनिवास वंगारी, भीमराज कोडम, श्रीनिवास एलाराम, दत्तात्रेय न्यालपेल्ली, शंकरराव बत्तीन, निलेश मुदिगोंडा, विनोद बोगा, लक्ष्मण इगे, राम जिंदम, हनुमान म्याकल, धनंजय येनगुपटला, रवि बेत, शेखर दिकोंडा, अशोक बिज्जा, संभार कृष्णा, रमेश कोंडा, भास्कर गाली, विनायक बत्तीन,अंबादास चाटला,राजू मंगलारप सागर सब्बन, श्रीनिवास श्रीगादी, व्यंकटेश नक्का आणि इतर समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.