
महोदय…
मी जिल्हा वीधी सेवा अहिल्यानगर येथे मोफत वकील मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्या प्रमाणे मला (सोबत जोडले)विधी सेवे वतीने मार्फत अँड. सारीका खाकाल माझे ग्राहक मंच येते तक्रार दाखल करणे साठी नियुक्त होऊन मिळाले .
परंतु त्यांनी या संपूर्ण काळावधीत मी त्यांना अनेक वेळा भेटुनही तक्रार दाखल करणेस सांगितले परंतु त्यांनी तक्रार दाखल केली नाही ज्या बिल्डर व जागा मालाक व बैंक विरोधात मला तक्रार दाखल करायची होती त्या बैंकानी त्या काळात माझा फ्लॅट चा ताबा काढुन घेतला आहे व या कारणांने मी व माझे कुटुंब रस्त्यावर आले आहे.
माझा ताबा काढुन घेतल्या नंतर मी अँड सारीका खाकाल यांना भेटलो असता त्यांनी मला तुम्ही सरकारी नोकर न असल्याने बैंक तूमचे विरोधात काहीही करू शकत नाही असे सांगितले तेव्हा मी माझे मित्राचे सल्लाने ग्राहक मंच येते केस दाखल करण्यास गेलो असता माझा ताबा गेल्याने मी ग्राहक नाही असे म्हणुन ही केस दाखल होणार नाही असे सांगितले आहे
माझी आपणास नम्र विनंती की मागील दोन वर्षांपासून माझी तक्रार ग्राहक मंच मध्ये का दाखल केली नाही या बाबत संबंधित वकिलाची चोकशी व्हावी मला न्याय मिळवून द्यावा हि विनंती…
पोहच तारीख 09/04/2025
आज बारा दिवस झाले आहे आजुन ही उतर आले नाही..
सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर यांनी लवकरात लवकर या केस कडे लक्ष द्यावे धन्यवाद..
आपला विश्वासू –
विजय एकनाथ लोंढे
9271411606