भटक्या कुत्रांबाबत त्वरित कारवाई करण्यात बाबत निवेदन-ॲड.ऋग्वेद महेंद्र (भैय्या) गंधे
अहिल्यानगर

मागिल काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे.. तसेच नागरिकांमघे अत्यंत भीतीचे व चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागात हे कुत्रे समूहाने संघटित होऊन रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास देत असतात,अंगावर धावून जातात ,तसेच बऱ्याच वेळेस हे कुत्रे चावा घेतात त्यामुळे सामान्य लोकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते.

तसेच बऱ्याच ठिकाणी असे निदर्शनास आले आहे की काही लोक या कुत्र्यांना नको त्या गोष्टी खायला देतात व त्यामुळे कुत्रे पिसाळण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.
नुकतेच २ दिवसांपूर्वी एका २ वर्षाच्या लहान मुलीला कुत्र्यांनी चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली असून आमची आपल्याला नम्र विनंती आहे की त्वरित या बाबत कारवाई करण्यात यावी व ठोस उपाययोजना करून लवकरात लवकर योग्य ते उपाय करावेत..

ह्या बाबतचे निवेदन ॲड.ऋग्वेद महेंद्र ( भैय्या ) गंधे यांनी माननीय महापौर सौ.ज्योतीताई अमोलजी गाडे व माननीय आयुक्त यशवंतजी डांगे साहेबांनी दिले.




