
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची सुत्रे खा. सुनेत्रा पवार यांच्या हाती येणार हे स्पष्ट झाले आहे.
लोकभावना आणि पक्षातील नेते, आमदारांचा आग्रह लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारण्याची तयारी दर्शवली आहे.

त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्यासोबत जय पवार आणि नरेश अरोरा हे देखील बारामती येथून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
शनिवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. शनिवारीच सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक दुपारी 2 वाजता विधिमंडळातील सभागृहात होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे.
त्यानंतर त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी 5 वाजता पार पडेल, अशी माहिती आहे. यासाठी सुनेत्रा पवार, जय पवार हे बारामतीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळं बारामतीकरांवर दु: खाचा डोंगर कोसळला. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड होईल. त्यानंतर त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल.
शुक्रवारी अजित पवार यांना सावडण्याचा विधी झाला, त्यानंतर त्यांच्या अस्थी त्या सोनगाव येथील नीरा नदीत विसर्जित करण्यात आल्या.




