राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती येथे विमानाचे लँडिग होत असताना अपघा त झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाले आहे.
दरम्यान, राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. कुटुंबीयांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आज, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ एनडीए सहकारी अजित पवार यांचे एका दुःखद अपघातात निधन झाल्याच्या बातमीने माझे मन खूप दुःखी झाले आहे
. गेल्या साडेतीन दशकांपासून अजित पवार यांनी महाराष्ट्रातील समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी ज्या पद्धतीने स्वतःला समर्पित केले ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ते महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणाशी संबंधित असंख्य मुद्द्यांवर दीर्घ चर्चा करत असत. त्यांचे निधन हे केवळ एनडीए कुटुंबाचेच नाही तर माझ्यासाठीही एक वैयक्तिक नुकसान आहे.
मी पवार कुटुंबाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी, संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे. देव त्यांच्या दिव्य चरणी स्थान देवो.
ओम शांती शांती शांती – अमित शाह, गृहमंत्री




