ब्रेकिंगमहाराष्ट्र
अहमदनगर-आष्टी रेल्वेतून जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या उड्या
अहमदनगर - रेल्वेला भीषण आग

अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत रेल्वेचे सहा डबे जळून पूर्ण खाक झाले आहेत. मात्र जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्नतीन तासापासून सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी उड्या मारुन आपला जीव वाचवला आहे. आगीमुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. कोणी प्रवाशी आतमध्ये अडकलाय का हे तपासलं जात आहे. सदर घडनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माम झाले आहे.
वाळुंज जवळील सोलापूर बायपास रोड जवळ ही घटना झाल्याची माहिती आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस आणि रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असून आटोक्यात आणली आहे. सहा डब्यांना भीषण आग लागल्याचं समजतंय.