
शाळांतील मुलींची गळती कमी व्हावी, तसेच मुलींचे शिक्षण अर्धवट सुटू नये यासाठी एसटी महामंडळातर्फे ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना शाळा-महाविद्यालयांत जाण्यासाठी मोफत पास दिला जातो.
या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात ३० हजार १०२ विद्यार्थिनींनी या मोफत पास योजनेचा लाभ घेतला आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवासी वाढवण्यासाठी विविध सवलतीच्या योजना राबवल्या जातात. त्याचाच भाग म्हणून मागील वर्षापासून महिलांना अर्धे तिकीट करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थिनींसाठी तर चक्क मोफत पासची सुविधा महामंडळातर्फे गेल्या दहा वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींचा समावेश असला तरी महामंडळाकडून प्राथमिक शाळांच्या मुलींनाही पास दिला जातो.