ब्रेकिंगमहाराष्ट्र
मनपा प्रभाग क्रमांक दोनचे ऑफिस 10-45 वाजले तरी कुलूप उघडलेले नाही – शिवराष्ट्र सेना
अहिल्यानगर

आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खात….
अ.नगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन या कार्यालयाचे 10:45 वाजले तरी नागरिक आपले दैनंदिन स्वतःचे नागरी सुविधेचे प्रश्न घेऊन मग ते जन्म मृत्यू असो की किंवा रस्त्याचे घरपट्टी पाणीपट्टी तसेच विविध प्रकारचे तक्रारी घेऊन मनपामध्ये येतात..
परंतु ज्या अधिकाऱ्यांना ७०- ७० हजार पगार असून देखील ते अजून सुद्धा झोपेतून जागे झालेले नाही जो झोपलेला असतो. त्याला उठवता येते, परंतु जो झोपेचा सोंग घेतो, त्याला उठवता येत नाही अशी काहीशी मनपाच्या कर्मचाऱ्यांची अवस्था झालेली आहे.
तरी या विरोधात शिवराष्ट्र सेना पक्षाच्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान ही बाब लक्षात आली व नागरिकांनी पक्षाकडे तक्रारी केल्या.. अशी माहिती शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने देण्यात आली.




