अहिल्यानगर येथील सुजाता म्याना यांनी सांगितला वाई पोलीसांचा हलगर्जीपणा नागरिकांना होतोय त्रास.
अहिल्यानगर

अहिल्यानगर येथील सुजाता म्याना हे दि .16/01/2026 रोजी आपल्या मैञीणीं बरोबर वाई सातारा येथील मांढरदेवी येथे दर्शन घेण्यासाठी वाई सातारा येथे आले असता गर्दीचा फायदा घेऊन एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र वजन 2.50 तोळे गंठण लंपास केले.
हे त्यांना कळाले असता मांढरादेवी येथील असलेले पोलीस कर्मचारी लेंबे यांना संपर्क साधून मंदिराजवळ सिसिटीव्ही फुटेज बघीतले असता त्यांच्या लक्षात आले की चोर कोण आहे.
त्यांनी सांगीतले कि आम्ही पुढील तपास केल्यानंतर फोन करु. दहा दिवस होऊन सुध्दा फोन न आल्याने वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर एफ आय आर नोंद करून घेतले .
वारंवार फोन करून सुध्दा चार महिने होऊन सुध्दा अध्याप काहीच फरक पडत नाही. हा निव्वळ हलगर्जी पणा असून सातारा येथील नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक पिंगळे साहेबांना दि. 6/05/2026 रोजी निवेदन देण्यासाठी आलो असता त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून देईल. आश्वासन दिले .



