
अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी गंज बाजार परिसरात प्रत्यक्ष पाहणी करत अतिक्रमणाविरुद्ध कडक कारवाई केली. फळ विक्रेत्यांच्या गाड्या तसेच पूजा साहित्य दुकानदारांनी दुकानाबाहेर केलेले अतिक्रमण हटवण्यात आले.
गंज बाजार ही शहरातील अत्यंत गर्दीची बाजारपेठ असून येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या अतिक्रमणामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते आणखी संकुचित होत होते, परिणामी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसेच पार्किंगची समस्या देखील गंभीर बनत होती.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना मोकळी, सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून संबंधितांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, यापुढे कोणतेही अतिक्रमण आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
स्वच्छ, सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त अहिल्यानगरसाठी महानगरपालिका कटिबद्ध..




