
अहिल्यानगर हॉटेलमधील काचेचे फर्निचर फोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरणगाव येथील एका व्यावसायिकाला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत जखमी झालेल्या मिठु कार्तिक दत्त यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, कोमल फरसान मार्ट आणि हॉटेलचे मालक भाऊसाहेब विश्वनाथ नांगरे व जावेद छोटू आतार (दोघे रा. वाळकी) यांच्याशी मयत मिठु दत्त यांचा फर्निचरच्या नुकसानीवरून वाद झाला होता.
याच वादाचा राग मनात धरून आरोपी भाऊसाहेब नांगरे, जावेद आतार आणि त्यांच्या हॉटेलमधील तीन कामगारांनी मिळून ६ मार्च २०२५ रोजी आरणगाव येथील ‘अजय फॅब्रिकेशन’ दुकानात घुसून दत्त यांना लाथाबुक्क्यांनी व शस्त्राने गंभीर मारहाण केली.




