
मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतोय. आज अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
परतीच्या पावसाचे ढग राज्यावर आहेत. पंजाब, हरिणाया आणि जम्मू काश्मीरमध्ये तर पावसाने हाहाकार माजवलाय. आज रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर मुंबईला येलो अलर्ट.
सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. ठाणे, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, लातूर, अकोला, धाराशिव, अमरावती, नागपूर, भंडारा या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, आज फार महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.



