बाईपण भारी देवा या युक्ती प्रमाणे स्वतः च्या हिमतीने केलेले काम व त्याचे फळ व श्रेय मिळते – डॉ. रत्ना बल्लाळ
अहमदनगर प्रतिनिधी

AR Digital Media आणि AR news online portal च्या माध्यमातून स्वातंत्र्यदिना निमित्ताने अस्सल भारतीय आयुर्वेद ज्ञानाविषयी विशेष पुस्तिका “आयुर्वेद तथ्य आणि कथ्य” प्रमुख पाहुणे डॉ. रत्ना बल्लाळ आणि डॉ. सगुणा ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्ते त्रेता फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांच्या हस्ते आज प्रकाशित झाली आहे.
आपल्याच मनात बरेच समज गैरसमज आहेत. काही ऐकीव माहितीच्या आधारे आपण या शास्त्राविषयी उगाच भिती बाळगून आहोत का ? पथ्याविषयी बाऊ करतो का ? याच सगळ्याचा मागोवा या पुस्तिकेत घेतला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.
डॉ. रत्ना बल्लाळ या त्यांच्या भाषणात म्हणाले की स्त्री शक्ती घराघरात आहे. त्या साठी हा सामान्य लोकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला हा उपक्रम खरंच खूप छान आहे.
डॉ. सगुणा ठाकरे यांनी ही त्यांचे विचार मांडले की आयुर्वेदा विषयी खुप समज गैरसमज आहेत. आणि आयुर्वेदा विषयी जनजागृती खुप कमी लोक करतात. आणि अशी पुरवणी काढण्यासाठी कोणी तरी पुढे आले आणि ग्राउंड लेववर काम करतेय याचा अभिमान आणि गर्व वाटतो आहे.तसेच धन्वंतरी चा श्लोक म्हणून त्यांनी सौ. श्रुती बत्तीन-बोज्जा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच या माहिती पुस्तकात ज्या डाॅ. लोकांनी लेख दिले त्यांनी त्यांचा परिचय करून दिला.आणि माहिती पुस्तक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्विकारले.
या पुस्तकात वैद्य संकेत आडाळे यांनी पंचकर्म त्रासदायक उपचार पद्धती ??, वैद्य गोविंद भुकन यांनी आयुर्वेद खरंच मंद गतीने उपचार करतो??, वैद्य आदिती पोळ यांनी पथ्य या विषयावर आपले विचार मांडले आहेत.तसेच वैद्य नेहा धर्माधिकारी यांनी आयुर्वेद एक पर्यायी चिकित्सा पद्धती या विषयावर आपले विचार मांडले आहेत. आणि या सर्वांचे गुरू वैद्य अनिकेत घोटणकर यांनी ही स्वास्थायन या विषयावर आपले विचार मांडले आहेत..
तसेच वैद्य गोविंद भुकन, वैद्य नेहा धर्माधिकारी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आम्हाला आमचे विचार मांडायला एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले या साठी आम्हाला खूप मनापासून आनंद होत आहे. आम्ही आमचे विचार आयुर्वेद विषयी चे ज्ञान एका लिंक द्वारे लाखो लोकांपर्यंत पोहचू शकतो. कारण आम्ही सोशल नेटवर्किंग च्या माध्यमातून लिमिटेड लोकांपर्यंत पोहचू शकत होतो.. त्या साठी आम्ही काहितरी करायला पाहिजे या साठी आम्ही एक प्लॅटफॉर्म शोधात होतो.. आणि तो आम्हाला मिळाला तसेच सपोर्ट ही मिळाला यासाठी सौ. श्रुती बत्तीन-बोज्जा यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दरेकर यांनी डिजिटल मिडिया म्हणजे काय?? का सध्या काळाची गरज आहे याची वेगवेगळे उदाहरण देऊन विशेष पुस्तिका, लेख, जाहिरात यांना प्रसिद्ध करण्यासाठी चे लोकांचे गैरसमज काय आहेत हे खुप छान समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खुप छान पद्धतीने सौ. स्वाती रानडे ताई यांनी केले.मान्यवरांचे स्वागत सौ. अंबिका बत्तीन, सौ. श्रुती बत्तीन-बोज्जा आणि अभिजित बोज्जा तसेच आभार प्रदर्शन सौ. लक्ष्मी म्याना यांनी केले.
नंतर येणाऱ्या आगामी इतर पुस्तिकांविषयी माहिती AR Digital Media आणि AR news online portal च्या मुख्य संपादिका सौ.श्रुती बत्तीन – बोज्जा यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम् या राष्ट्रीय गीता नी झाला.