दिल्लीच्या प्रवासी बहना आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेंबर स्मिता बरुआ यांचे अहमदनगर मध्ये आगमन
अहमदनगर

शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता दिल्लीच्या प्रवासी बहना आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेंबर स्मिता बरुआ यांचे आगमन झाले.
यावेळी स्वागत आणि छोटासा प्रोजेक्ट अशा पद्धतीने स्वागत केले आहे.
सुरुवातीला पारंपारिक पद्धतीने स्वागत झाल्यानंतर मग बचत गटाच्या काही प्रमुख महिलांना तिथे बोलवण्यात आले होते. आणि त्या महिला त्यांच्या गटाच्या माध्यमातून जे काही वस्तू बनवतात. तो म्हणजे खाऊचा बुके बनवला. त्यात प्रत्येक बचत गटाच्या महिलेचा प्रेमाचा आणि कष्टाचा हात होता. आणि त्यांनी तो प्रेमाने आणला होता तो कसा होता आणि काय वाटले हे आपण स्मिता बरुआ कडूनच ऐकावे.
त्यानंतर स्मिता बरुआ नगरच्या चार मंडळांची माहिती देण्यात आली . आणि बचत गटाची पण माहिती देण्यात आली. साधारण एक दीड तास हा संवाद चालला.
त्यानंतर गीता गिलडा यांच्या निवासस्थानी स्मिता ताई सोबत विधानसभा निवडणूक प्रमुख तसेच जिल्हाप्रमुख यांची भोजन बैठक झाली.
त्यामध्ये पुन्हा एकदा त्यांच्याकडून जेम पोर्टल संदर्भातली माहिती करून घेण्यात आली. त्यानंतर मॅडम ला दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचा अजेंडा देण्यात आला. आणि बरोबर रात्री नऊ वाजता त्यांना सर्कल गेस्ट हाऊस मध्ये सोडवण्यात आले.
शनिवारी सकाळी 11 पासून त्यांचा नगर शहरात प्रवास चालू राहील तर आज पहाटे तीन वाजता चेन्नई वरून जयंती गोपाल कृष्णन येतील.
शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जयंती गोपाल कृष्णन, गीता गिल्डा, अश्विनी थोरात, अर्चना चौधरी आर्थिक महिला महामंडळ महिला बचत गटाच्या प्रमुख आणि मंडळाचे अधिकारी संजय गरजे यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कामा संदर्भात जयंती मॅडमना निवेदन दिले.
त्यानंतर नगरहून राहता या गावी दौरा निघाला तेथे विखे फाउंडेशनच्या इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थ्यांची युवती आणि युवकांची संपर्क आणि संवाद झाला यावेळेस प्रश्नोत्तराचा संवाद झाला. यावेळी नवीन मतदारांना ईव्हीएम मशीन, आणि उमेदवार कसा निवडावा तसेच मोदी सरकारचे शिक्षण क्षेत्रातील काम या सर्वांवर शालिनीताई विखे पाटील यांनी तसेच जयंती मॅडमनी संभाषण केले. यावेळी युवक आणि युवतींची उपस्थिती उल्लेखनीय होती.
नव मतदारांशी संवाद साधल्यानंतर शिर्डी येथील साईबाबाच्या मंदिरात दर्शन घेण्यात आले. त्यानंतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळीस सोबत शालिनीताई विखे होत्या. मंदिर दर्शनानंतर उदबत्तीच्या कारखाना नारी भवन या ठिकाणी भेट देण्यात आली.
येथे साईबाबांच्या चरणी पडलेल्या फुलांची आणि त्यापासून होणाऱ्या अत्तर साबण उदबत्ती या उद्योगांची महिला बचत गटाच्या माध्यमातून कसे काम केले जाते याची पाहणी करण्यात आली प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहण्यात आले.
शालिनीताईनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रत्येक महिला बचत गटाच्या कामकाजाची माहिती दिली आणि एकही वस्तू वाया न घालवता रिसायकलिंग कसे केले जाते आणि
पर्यावरणाचे संवर्धन कसे केले जाते याचे एक एक पैलू उघडून सांगितले. त्यानंतर कोकोपीट उपक्रम आणि सॅनिटरी नॅपकिन नैसर्गिक उपक्रम याचीही पाहणी शालिनीताई विखे पाटील यांनी दाखविले. त्यांच्या कामाचा उत्साह आणि व्यासंग पाहून थक्क झालो आणि त्यांच्याकडून खूप काही ऊर्जा मिळाली त्या आधुनिक काळातल्या सावित्रीबाई म्हणायला हरकत नाही त्यांच्याकडे चाळीस हजार महिला असत गटाच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
पंतप्रधान आवास योजना लोणी प्रवरा गावी अमलात आलेली होती. एकूण साठ घर बांधलेले आढळले. लाभार्थीची संवाद साधला.