ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

स्वच्छ भारत अभियान…अहमदनगर मनपाला प्रथम क्रमांक

अहमदनगर

भारत स्वच्छ अभियानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संत गाडगेबाबा यांचे स्वच्छतेचे स्वप्न साकार होताना दिसत आहे अहमदनगर महानगरपालिकेने देखील सन 2020 पासून भारत स्वच्छ अभियानामध्ये भाग घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करीत नगर शहर कचराकुंडी मुक्त केले आहे.

याचबरोबर नागरिकही आपला कचरा घंटागाडी मध्येच टाकत असल्यामुळे आपल्या शहराला स्वच्छतेचे रूप प्राप्त झाले आहे या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य ही सुदृढ निरोगी राहण्यास मदत होत असते.

अहमदनगर महानगरपालिकेने भारत स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला असून नगर स्वच्छ भारत अभियानांतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन 2023 या स्पर्धेमध्ये राज्यातील ड वर्ग महापालिकेत अहमदनगर मनपाला तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन तर नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळाला असल्याची माहिती देत आमदार संग्राम जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.

आमदार संग्राम जगताप यांनी पुढे सांगितले की, नागरिकांच्या सहकार्यातून नगर शहराची वाटचाल विकसित शहराकडे सुरू असून शहर स्वच्छतेबाबतची कामगिरी अशीच राहणार आहे, आपण सर्व जण अधिक जोमाने काम करीत देशांमध्ये नावलौकिक मिळवू, या नगर शहरामध्ये स्वच्छतेबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करीत अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम केले असल्यामुळेच तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे आपण आपले शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यास यशस्वी झालो आहे.

अहमदनगर महानगरपालिकेला भारत स्वच्छ अभियानामध्ये मिळालेल्या मानांकनासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो व नगरवासीयांनी असे स्वच्छतेबाबत आपले काम करावे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

नगर शहर कचराकुंडी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेत घंटागाडीची संकल्पना प्रत्यक्षात साकारली, यासाठी मनपा अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक यांचे योगदान लाभले.

तसेच माजी महापौर रोहिणी शेंडगे,व माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून शहरात मनपाच्या वतीने स्वच्छता अभियान सुरु केले, स्वच्छ भारत अभियानात केंद्र शासनाच्या समितीमार्फत झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात मागील काही वर्षापासून नगर शहराने प्रगती केली आहे.तसेच वृक्षरोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभी करत नगर शहर स्वच्छ,सुंदर व हरित करण्याची संकल्पना यशस्वीपणे राबवली जात असल्याचे मत आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे