
उपनेत्या मीना कांबळी यांनी उद्धव गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीना कांबळी यांचे पक्षात स्वागत केले. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर झालेल्या सोहळ्यात मीना कांबळी यांनी पक्षप्रवेश केला.
उद्धव गटाने पक्ष विस्तारासाठी कार्यकारिणीचा विस्तार केला. प्रामुख्याने मुंबई – ठाणे पट्ट्यातील नेत्यांना प्राधान्य देण्यात आले. पण राज्याच्या उर्वरित भागांतील पदाधिकाऱ्यांना पुरेशी संधी दिलेली नाही. यामुळे उद्धव गटात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. काही महिला पदाधिकारी फारच नव्या असूनही त्यांना पक्षात भरपूर महत्त्व दिले जात आहे. याउलट आधीपासून काम करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यातूनच निर्माण झालेल्या नाराजीतून उपनेत्या मीना कांबळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.