ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

युवक राष्ट्राच्या विकासाचा कणा – वक्ते दत्तात्रय वारकड 

वकीलराव लंघे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसगाव, तालुका नेवासा येथे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी लेखक व प्रेरणादायी वक्ते श्री दत्तात्रय अहिल्यानगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

भारत देशाला युवकांचा देश असे संबोधले जाते कारण भारतामध्ये तरुणांचे प्रमाण हे अधिक आहे. राष्ट्राच्या विकासामध्ये युवक हा राष्ट्राच्या विकासाचा कणा आहे असे प्रतिपादन लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी केले. आज भारत देश हा जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे आणि या विकासामध्ये तरुणांचे योगदान अतिशय मौलिक आहे. विद्यार्थ्यांनी आपला आत्मिक विकास साधत असताना व्यक्तिमत्त्वाचा विकास चालत असताना प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापर करून आपले जीवन सुजलम सफलम बनवावे परंतु इफेक्टचा इफेक्ट साईड इफेक्ट असं म्हटलं जातं म्हणजे आपला विकास साधत असताना मोबाईल सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपल्या जीवनामध्ये अतिरिक्त ताण तणाव निर्माण होणार नाही व त्याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होणार नाहीत याची काळजी विद्यार्थ्यांनी घेणे काळाची गरज आहे. मोबाईलचा वापर फक्त कामा पुरताच करावा असे आवाहन वक्ते श्री दत्तात्रय वारकड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

वाचन संस्कृतीचा विकास साधण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता प्रवृत्त केले. त्याकरिता वेळेचे व्यवस्थापन कसे करावे याचा मार्गही सांगितला. जर विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठण्याची सवय लावली म्हणजे त्यांना वेळेचा सदुपयोग करून घेता येईल. जर एक तास आपण लवकर उठलो तर वर्षभराचे 365 कामाचे तास आपल्याला अतिरिक्त मिळतात म्हणजे 45 दिवस अतिरिक्त मिळतात म्हणजेच दीड महिना अतिरिक्त मिळतो इतरांचे बारा महिने तर सकाळी लवकर उठणारा विद्यार्थ्यांचे साडेतेरा महिने होतील म्हणजे हा दीड महिना जो आहे हा विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्यासाठी अतिरिक्त मिळत आहे या अतिरिक्त वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी आत्मचरित्र पुस्तकांचे वाचन करावे.

त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज , महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर माऊली, यांच्या व इतर महान विभुती यांचे आत्मचरित्र चे तसेच प्रेरणादायी पुस्तकांचे दोन पानं तरी वाचन करावे की जेणेकरून आपला व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याकरिता प्रेरणा मिळेल .

त्याचप्रमाणे दहा ते पंधरा मिनिटं निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरावे , व्यायाम करावा, ध्यानधारणा करावी की जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल व आपले जीवन सुजलाम सफलम बनेल व एक आदर्श विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटण्याला मदत होईल असे मौलिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. मन सांगेल तसं आपण वागणे ऐवजी आपण आपल्या मनाला नियंत्रित ठेवून आपण सांगेल तसं आपलं मन वागलं पाहिजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपण फिरण्याऐवजी आपण सांगू त्या पद्धतीने घड्याळ चालले पाहिजे म्हणजेच वेळेचे नियोजन झालं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा सोयीस्कर मार्गही वक्ते श्री वारकड यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.

महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महंत शूरवीर थोर समाज सुधारक यांनी आपले आयुष्य पणाला लावून आपल्या या महाराष्ट्रामध्ये कार्य कर्तुत्वाचा ठसा उमटवला व आपल्या भारत देशाला जागतिक पातळीवर सुजलम सफलम बनवण्याकरिता आपले आयुष्य खर्च केले अशा या महान संत महंत व समाज सुधारकांच्या त्याचप्रमाणे संस्कृतीचा वारसा जतन करण्याचे कार्य हे युवकांच्या हाती आहे आणि त्याकरिता युवकांनी आपला आत्मिक विकास घडवून आणणे अतिशय महत्त्वाचे आहे असेही वक्ते श्री दत्तात्रय वारकड यांनी नमूद केले. सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक रिल्स याचा आपल्या जीवनामध्ये विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी निश्चितच घ्यावी व मोबाईलचा वापर हा फक्त कामापुरताच करावा असेही कळकळीचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना वक्ते श्री वारकड यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बाबासाहेब धनवटे यांनी वक्ते यांचा परिचय करून दिला व स्वागत केले . श्री महेश देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार श्री सागर वाघमारे यांनी मानले. या व्याख्यानाच्या प्रसंगी बहुसंख्येने विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे