ब्रेकिंगमहाराष्ट्र
मुंबई मधील प्रसिध्द नरिमन पॉईंट येथे समुद्र मागे हटला, नागरिकांमध्ये आश्चर्याची लाट
मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध नरिमन पॉईंट परिसरात समुद्राचे पाणी अचानक मागे हटल्याची घटना समोर आली आहे. सकाळच्या सुमारास समुद्राची पातळी नेहमीपेक्षा खाली गेल्याने किनाऱ्यावर मोठा भाग उघडा पडलेला दिसला. या अनोख्या नैसर्गिक बदलामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, भरती-ओहोटी आणि हवामानातील बदलांमुळे समुद्राच्या पातळीत असे तात्पुरते बदल दिसू शकतात. मात्र, यासंबंधी कोणताही धोका नसल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.
मुंबईतील समुद्रकिनारी अशा घटना वेळोवेळी घडत असतात, पण नरिमन पॉईंटसारख्या गजबजलेल्या भागात ही दृश्ये दिसल्याने लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.




