ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात रिक्षा थांबविण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला

अहिल्यानगर

अहिल्यानगर-येथील माळीवाडा बस स्थानक परिसरात रिक्षा थांबवण्याच्या किरकोळ वादातून दोन आरोपींनी एका रिक्षाचालकावर शिवीगाळ करत लोखंडी अँगलने डोयात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या माहितीनुसार, सिराज इब्राहिम सय्यद (वय २०, रा. शहा कॉलनी, भिंगार) हे रिक्षाचालक दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास माळीवाडा बस स्थानकाजवळील पार्सल गेटसमोर प्रवाशांना उतरवत होते.

त्याच वेळी आरोपी वसंत रंगनाथ मोकाटे (रा. जाधव मळा, बुरुडगाव रोड) आणि नवनाथ विष्णु सातपुते (रा. सावेडी नाका) हे दोघे तेथे आले. तू येथे का आलास, तू येथे गाडी थांबवायची नाही असे म्हणत त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली.

या दोघांनी रिक्षाचालक सिराज सय्यद यांना रिक्षातून बाहेर काढले. त्यानंतर हाताच्या चापटीने, बुक्क्यांनी आणि लाथांनी मारहाण केली. आरोपी क्रमांक दोन, नवनाथ सातपुते, याने जवळ असलेला लोखंडी अँगल घेऊन फिर्यादीच्या डोयात मारून गंभीर जखमी केले.

या जीवघेण्या हल्ल्यानंतर जखमी रिक्षाचालक सिराज सय्यद यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे